पर्यावरणाच्या ऱ्हास/संकटामागे व्यापक गरिबी हे आणखी एक कारण आहे. एकूण भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे 30% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. ते जगण्यासाठी आणि उर्जेची किंवा इंधनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केवळ जंगलांवर अवलंबून असतात . हे लोक बिनदिक्कत वृक्षतोड करतात.