विनातारण कर्ज:
हे कर्ज घेताना आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नसते. म्हणजेच आपल्याला सोने, मालमत्ता किंवा इतर किंमती वस्तू तारण ठेवाव्या लागत नाही. यामध्ये शैक्षणिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यात येते. मुख्यतः हे 100 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला रुजू झाल्यानंतर विद्यार्थी कर्ज फेडू शकता हे कर्ज भारतामध्ये व परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिले जाते. ह्या कर्जाचा कालावधी हा 5 ते 7 वर्षांपर्यंत असू शकतो. तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणासाठी बँका प्राधान्याने शैक्षणिक कर्ज देतात.