सध्या भारतामध्ये विद्युतीकरण आणि देखभालीची सर्व कामे, भारतीय विद्युत अधिनियम २००३ व भारतीय विद्युत नियम १९५६अन्वये केली जातात. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नुकत्याच नियंत्रण नियमावली २०१० आणि २०११ या संपूर्ण देशासाठी जारी केल्या आहेत. यामुळे ग्राहकाचे अधिकार व सुरक्षा यात काही बदल होऊ शकतात.