व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची अवस्था असे म्हणतात.