शिक्षण हे साध्य नाही असा एक नवा मुद्दा ते मांडतात. आपण मुलांना पदवी हे साध्य सांगतो. पास होण्यासाठी शिकणे असे सांगतो. पण कृष्णजी म्हणतात, 'जेव्हा शिक्षण हे केवळ काही ईप्सित गाठण्याचे साधन असते तेव्हा ईप्सित साध्य होताक्षणीच तुम्ही साधन विसरून जाता आणि खरोखरीच ते शिकणेच नसते.