सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची बचत होणार आहे.