महाराष्ट्र राज्यातील जनहिताची कामे अडकून न राहता ती सुरू राहावीत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून ती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवली आहे. गुवाहाटीला जाऊन बसलेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांचा कार्यभार जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख पाटील यांना सोपवण्यात आला आहे.