काही वर्षांत मशागतीवर, खतांवर, बियाण्यांवर केलेला खर्चही शेती उत्पादनातून मिळत नाही. पर्यायाने शेती तोट्यात जाते. शेतकरी कर्जबाजारी होतात. कोरडवाहू शेतीमधील समस्येवर उपाय योजना करण्यासाठी पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत माती व जलसंधारण हा एकमेव ठोस कार्यक्रम आखणे गरजेचे आणि हिताचे आहे.