भांडवल कुठलीही सीमा जुमानत नाही. भांडवल वाढ तर घडवून आणते, पण मक्तेदारीची परिस्थिती असेल व पुरेशी स्पर्धा नसेल तर ही वाढ वरच्या दिशेने जमा होते. ती बहुसंख्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. सामान्य जनतेच्या बँकेतील ठेवी, शेअर बाजारातील गुंतवणूक यांचे रूपांतर भांडवलात होत असले तर वाढीच्या प्रक्रियेत अनेकजण बाजूला काढले जातात.