भारत देशात जायफळ आणि जावित्री सर्वाधिक उत्पादन केरळ राज्यात होते. यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. केरळ ही आपल्या देशातील 'मसाल्यांची भूमी' आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक मसाले आपल्याच देशात पिकवले जातात, म्हणूनच आपल्या देशाला जगाची 'मसाल्यांची भूमी' म्हटले जाते, तसेच त्याला 'स्पाईस फॅक्टरी' म्हणतात.