समृद्घ मत्स्यक्षेत्रांच्या निर्मितीमागील वेगवेगळ्या कारणांपैकी उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संयोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. सागरी प्रवाह नसते, तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या.