सामाजीकरणाचे समाजजीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक पिढी नव्या पिढीकडे आपल्या समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या समग्र सामाजिक वंशाचा ठेवा हस्तांतरित करीत असते,म्हणजेच संस्कृतीचे संक्रमण घडून येते. सामाजिक नियंत्रणाचे प्रभावी साधन म्हणूनही ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.