साहित्य हे मानवसापेक्ष असून, मानव हा समाजसापेक्ष तर समाज संस्कृतीसापेक्ष असल्याने साहित्याच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ उलगडण्याचे सामाजिक प्रयोजन साध्य होते. यामुळेच साहित्य हा समाजाचा आरसा आहे, या विधानाला कमालीची अर्थगर्भता आहे.