कलावंताच्या प्रतिभेचा प्रत्यय देणारी साहित्यकृती सौंदर्यपूर्ण, चैतन्ययुक्त, नित्यनूतन भासते. या सौंदर्याचा किंवा साहित्यास लालित्यपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या लक्षणांचा सखोल व सूक्ष्म विचार भारतीय साहित्यमीमांसेत आढळतो. संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हे ललित साहित्याचे प्राणभूत तत्त्व मानले आहे.