साहित्यामध्ये जीवनाचे चित्रण करून समाजजीवनाला गती देणे हे साहित्याचे प्रयोजन असून मराठीतील जीवनवादी लेखक या विचारधारेचे आहेत. कलावंत समाजाचाच भाग आहे, समाजाच्या अंतरंगातील संघर्ष चित्रित करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे वाङमयच पुरोगामी ठरते, असे ही विचारधारा मानते.