तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा.