अशुध्द पाणी व कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार अशुध्द पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गॅस्ट्रो, पोलिओ,कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग,विषमज्वर, इत्यादी अनेक आजार अशुध्द पाणी व अस्वच्छता यांमुळेच होतात. यातून कुपोषण वाढते.