भारताचे पहिले पंतप्रधानं नेहरुंनी लाल किल्ल्यावर फडकवला होता तिरंगा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला होता. तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधानांनी ही परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.