१९४७ साली राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच भारताचे विभाजन झाले आणि प्रचंड जातीय दंगे झाले तेव्हा ते हिंसक जातीय दंगे आवरणे आणि दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित करणे ही पहिली समस्या होती. दोन्ही देशातून होणारे स्थलांतर हे शांततापूर्वक कसे व्हावे ही पहिली समस्या होती. १९४८ साली पाकिस्तान विरुद्ध युद्ध झाले.