स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. फाळणीमुळे सुमारे 80 लाख निर्वासित पाकिस्तानातून भारतात परत आले. या निर्वासितांचे पुनर्वसन हे मोठे आव्हान होते. दुसरे आव्हान होते 562 लहान-मोठ्या संस्थानांचे संयुक्त भारतात एकत्रीकरण करणे.