प्रारंभी भारतातील वृत्तपत्रे इंग्र्जी लोकांनी सुरू केली होती. ही वृत्तपत्रे प्रमुखाने शासनाच्या धोरणाची तरफदारी करीत असत . इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा व घेतलेले निर्णय याविषयीच ही वृत्तपत्रे माहिती देत. ब्रिटिश प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी करणे हेच जणू या वृत्तपत्राचे कार्य होते .