हक्क आणि कर्तव्ये परस्परसंबंधी असतात. प्रत्येक प्रकारच्या हक्काबरोबर काही कर्तव्यांचे पालन करणे अपरिहार्य ठरते. समाजात कर्तव्यांची जाणीव नसेल, तर हक्कांचाही उपभोग सर्व व्यक्तींना घेता येणार नाही. म्हणून हक्क व कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले पाहिजे.