हवामान बदलाचे दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक परिणाम हे संपूर्ण जगातच होणार आहेत. वारंवार आलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पूर यांमुळे पिके नष्ट होतात. यामुळे उत्पन्नाचे नुकसान होते आणि अन्नटंचाई निर्माण होते. समुद्राची वाढती पातळी, वाळवंटीकरण आणि जंगलतोड यामुळे लोकांचं राहणीमान आणि उपजीविका यावर परिणाम होतो आहे.