मासेमारीच्या दृष्टीने तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनाच्या दृष्टीने या महासागराला विशेष महत्त्व आहे. हिंदी महासागर हा शांततेचा पट्टा राहावा, महासत्तांच्या सत्तास्पर्धांपासून मुक्त असावा आणि महासागर परिसरातील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, या दृष्टीने नेहमीच भारताचे परराष्ट्रीय धोरण प्रयत्नशील आहे.