या संघटनेचे पहिले अधिवेशन जून १९४७ मध्ये हैदराबाद शहरात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या अधिवेशनात निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध निर्णायक लढा देण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.