भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकसंध भारत अस्तित्वात आला नाहीच. एकसंध भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी केलं होतं.

20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लीम लींग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर ब्रिटिशांचा आता भारतावर नियंत्रण उरलेलं नाही अशा आशयाचा अहवाल तत्कालीन व्हॉईसरॉय व्हेवेल यांनी ब्रिटिश सरकारकडे पाठवला होता. तोही नाकारणं ब्रिटिश सरकारला शक्य नव्हतं. तसंच ब्रिटिश भारत सोडताहेत यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आधी ही विशिष्ट तारीख निवडण्यात आली.