भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली. या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.