ब्रिटिश सरकारने जाहीर तर केलं की, पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल. पण, यात अडचण अशी होती की, माऊंटबॅटन यांना 14 आणि 15 ऑगस्ट या दिवशी भारतात नवी दिल्ली इथं भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करायची होती.