निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी जीवनात प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे घडून आलीत आणि भविष्यातही येतील.