भारतातील लोकशाही प्रणाली सुदृढ, सक्षम व विकसित करण्याच्या उद्देशाने सरकारने कल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकर केला. त्या दृष्टीकोनातुन स्थानिक संस्थांना स्वायत्ता व स्वातंत्र्य देण्यात आले. त्याला अनुसरून १९४७ मध्ये ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणी सुरू झाली.