अनौपचारिक शिक्षणामुळे व्यक्तीला त्याच्या गरजा, पर्यावरणीय परिस्थिती आणि परस्पर संबंधांची जाणीव होण्यास मदत होते. या शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होऊन तो स्वयंसिद्ध होतो. या शिक्षणात कोणतीही पूर्वतयारी नसून वेळोवेळी काही ना काही शिकायला मिळते.