श्री प्रकाश (३ ऑगस्ट १८९० - २३ जून १९७१) हे भारतीय राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रशासक होते. त्यांनी १९४७ ते १९४९ या काळात पाकिस्तानमधील भारताचे पहिले उच्चायुक्त, १९४९ ते १९५० पर्यंत आसामचे राज्यपाल, १९५२ ते १९५६ पर्यंत मद्रासचे राज्यपाल आणि १९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.