खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.