ग्रामीण कथा या पुस्तकाचे लेखक कोण?

आधुनिक मराठी साहित्यात साधारणत: १९२५ पासून प्रादेशिक म्हणून ओळखली जाणारी ग्रामीण कथा २००० सालापर्यंत कशी विकसित होत गेली याचा डॉ. वासुदेव मुलाटे यांनी येथे विस्ताराने वेध घेतला आहे. ग्रामीण कथेची संकल्पना स्पष्ट करून ग्रामीण कथेची आरंभापासूनची वाटचाल त्यांनी या ग्रंथात नोंदविली आहे.
ग्रामीण माणूस, ग्रामीण परिसर आणि त्याची भाषा इ. संदर्भातील त्यांचे विवेचन महत्वाचे आहे. ग्रामीण कथेचा समग्र विचार करणारा हा पहिलाच ग्रंथ आहे.