राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता म. गांधींनी खेड्यांची दुर्दशा ओळखून तरुणांना 'खेड्याकडे चला' असा आदेश दिला. ग्रामीण विकासासाठी ग्रामोद्योगांचे पुनरुज्जीवन हा मार्ग त्यांनी सुचविला व चरखा हे केवळ त्याच नव्हे, तर समग्र राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक बनविले.