केंद्र शासनाने विशेष सुट दिलेल्या विशिष्ट वस्तू व सेवा वगळता अन्य सर्व वस्तू आणि सेवांना हा कायदा लागू आहे. जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहक संरक्षण कायदा अंमलबजावणीतून ग्राहक हित जपण्याचा आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्राहक कायद्याच्या माध्यमातून ग्राहकाला काही हक्क बहाल करण्यात आले आहेत.