महासागर, भूमिजल, खडकांच्या पोकळ्यांतील व खनिजांमधील पाणी, हिमनद्या तसेच हिम-बर्फ यांतील गोठलेले पाणी, वितळलेल्या अग्निज खडकांतील वा शिलारसातील नवजात पाणी, उन्हाळ्यांमधील (गरम पाण्याच्या झऱ्यांमधील) व गायझरांमधील पाणी, तसेच नदी, नाले, सरोवरे, जलाशय, डबकी इत्यादींमधील पाणी यांचा जलावरणात अंतर्भाव होतो.