दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातील निर्माता- दिग्दर्शक-पटकथालेखक होते. त्यांना 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' म्हटले जाते, कारण त्यांनी भारताचा पहिला पूर्ण लांबीचा मूकपट तयार केला. राजा हरिश्चंद्र हा 1913 साली प्रदर्शित झालेला त्यांचा पहिलाच चित्रपट आणि भारताचा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट होता.