महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली. यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला.