छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली

मे १६६० मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांकडून किल्ला परत मिळवण्यासाठी, विजापूरचा आदिल शाह दुसरा (१६५६-१६७२) याने सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य पन्हाळ्याला वेढा घालण्यासाठी पाठवले.