भारतीय संस्कृती ही पर्यावरणपूरकच आहे. निसर्गातील झाडे, नद्या, पर्वत, भूमी, सूर्य, चंद्र इत्यादी घटकांना देवतास्वरूप मानून त्यांचे पूजन, रक्षण करणे ही भारतीय संस्कृतीची विशेषता. आपल्या संस्कृतीतील या पर्यावरणस्नेही वृत्तीचे दाखले संस्कृत साहित्यात अनेक ठिकाणी आढळतात.