पर्यावरणाचे शास्त्र हे सर्वाधिक महत्वाचे ठरलेले आहे. अलीकडच्या काळात समाजामध्ये या विषयात खूप जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होण्याची शक्यता आहेच, पण एरवीही एक ज्ञान शाखा म्हणून तिचे महत्व आहेच.