ही सगळी प्रदूषके किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळे जवळपासची वेळणेश्वर, कुणकेश्वर, रेडी यासारखी अनेक खेडीही प्रदूषित होऊ लागली आहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे मरतात.