केशवचंद्र सेन यांनी महाराष्ट्राला भेट दिल्यानंतर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ३१ मार्च १८६७ मध्ये केली होती. या संघटनेच उद्देश लोकांनी एका देवावर विश्वास ठेवणे आणि एकाच देवाची उपासना करणे हा होता. प्रार्थना समाजात महादेव गोविंद रानडे सामील झाल्यानंतर तो लोकप्रिय झाला.