बेळगावमधून १२ मे १९४६ साली संयुक्त महाराष्ट्राचा हुंकार दिला गेला. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरणावर भर देण्यात आला. याच संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.