भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं सरकार स्थापन करण्यासाठी 1951 साली भारतात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. 1951 साली भारतात आतासारखं सोशल मीडिया, टीव्ही किंवा जाहिरातींचा सुळसुळाटही नव्हता. त्याकाळात ईव्हीएमसारख तंत्रज्ञानही नव्हतं. त्यामुळे प्रचारसभा, वृत्तपत्र, फलक, पत्रक, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार होत असे.

पहिल्या निवडणुकीत होते 54 पक्ष

1951 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकूण देशातील 54 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. देशभरात 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते.

त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अर्थातच नव्हते. 1951-52 बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्य़ात आले होते. कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचं स्वातंत्र्य मतदाराला देण्यात आलं होतं.

पहिल्या निवडणुकीबाबत या गोष्टी आहेत खास

1951-52 साली प्रत्येक मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा उपलब्ध होती.

मतदाराला कोणत्याही मतदान केंद्रावर आपलं मत बॉक्समध्ये टाकण्याचं स्वातंत्र्य होतं.

कोणत्याही उमेदवाराला मतं देण्याचं स्वातंत्र्य पहिल्या निवडणुकीत देण्यात आलं होतं.