भारताच्या सिनेमा इतिहासातली पहिली अभिनेत्री म्हणजे कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई रघुनाथ गोखले या आहेत. आज आपण चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त स्त्री हि मध्यवर्ती भूमिकेत बघतोय, पुरुषप्रधान चित्रपटांचं वलय मोडीत काढत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्र्यांनी आपले स्थान अजूनच भक्कम केले आहे. पण याची सुरवात महाराष्ट्रातून झाली होती.