गेल्या काही शतकांत जगात सर्वत्र नागरीकरणाची झपाट्याने वाढ होत असून सध्या जगात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या महानगरांची संख्या ९२ आहे. यातील आठ महानगरे भारतात आहेत. बृहन्‌मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, हैदराबाद, अहमदाबाद, बंगलोर व कानपूर ही भारतातील महानगरे आहेत.