१९३८ मध्ये काँग्रेसने नेहरूंच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली. १९३९ मध्येच दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे या समितीच्या कामात बराच व्यत्यय आला, तरीही १९४५ साली या समितीने भारतीय नियोजनाची तत्त्वे व कार्यक्रम सांगणारा अहवाल तयार केला.