उंबरखिंडची लढाई , शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून , मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.